आपल्या शरीराच्या अगदी लहान भागाला
जरी लागले, तरी आपल्या सबंध देहाला
त्याच्या वेदना होतात.
त्याचप्रमाणे आपण दिवसाची एक जरी
घटिका भगवंताच्या स्मरणात घालविली
तरी सबंध दिवस आपल्याला त्याची आठवण राहील.
म्हणूनच प्रत्येक दिवस भगवंताचे स्मरण करण्याचा
नियम करावा व तो कटाक्षाने पाळावा.
दिवसांचेच महिने होतात, महिन्यांचीच
वर्षे होतात आणि वर्षांचेच मिळून आपले आयुष्य
बनलेले असते.
या दृष्टीने दर दिवशीच्या नियम पालनाने आपले सर्व आयुष्य भगवंताच्या स्मरणात जाईल
व आयुष्य कृतार्थ होईल...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा