रविवार, २२ ऑक्टोबर, २०१७

पाप आणि कालचक्र

एकदा गंगामैयाला विचारण्यात आले की
तुझ्या पाण्यात आंघोळ केली की सर्व पापे धुतली
जातात. त्या सर्व पापांचे तू काय करतेस?
           गंगामैया म्हणाली, मी ते पाणी समुद्रात नेऊन
टाकते.
          समुद्राला विचारण्यात आले की, तू त्या
पापांचे काय करतोस?
       समुद्र म्हणाला माझ्याकडून ते पाणी ढग
घेऊन जातात.
        ढगाला विचारले... तू काय करतोस त्या
पापांचे?
ढग म्हणाला, मी पावसाच्या स्वरूपात पुन्हा
पृथ्वीवरच त्या लोकांच्या लोकांच्या घरावर
नेऊन टाकतो.
लक्षात ठेवा, कालचक्र असेच आहे
तुम्ही जे करणार, तेच तुम्हाला परत मिळणार.

        म्हणूनच आपले कर्म आपल्या ताब्यात हवे
आणि हो ते चांगलेच हवे.
भगवंत जसे ठेवतील तसेच राहण्याचा प्रयत्न करावा.

समाधानी राहावे. लोकांना त्रास होणार नाही,
असे आपले वागणे असावे.

ठेविलें अनंते तैसेचि राहावे | चित्ती असू
द्यावे समाधान ||

हनुमंत खाडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा